शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:52 IST

‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता.

अशोक पाटील ।इस्लामपूर : ‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. याला मंत्री खोत यांनीही तितकेच सडेतोडपणे उत्तर दिले आहे. ‘मीही त्यातूनच आलो आहे, आंदोलनातील दुधात किती पाणी असते, हे मला माहिती आहे,’ असा गौप्यस्फोट करून, गुरूला शिष्याने सरकारच्यावतीने गुरुदक्षिणा दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलन करून साखरसम्राटांना उसाला दर देण्यास भाग पाडले. ते दोघेही एकमेकांच्या सुख-दु:खाला धावले. त्यानंतर स्वाभिमानीला भाजपचे ग्रहण लागले आणि शेट्टी-खोत संघर्ष पेटला. आता दोघांनाही लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

खासदार शेट्टी यांनी दूध आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांची ताकद एकत्र केली आहे. या ताकदीला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. परंतु शेतकरी नेते म्हणवणारे मात्र दूध आंदोलनाविरोधात आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यांनी शेट्टी यांना टार्गेट केले आहे. जानकर यांनी तर दूध आंदोलनात सहभागी होणाºयांना सज्जड दम दिला आहे. त्याची उलट प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदार संघात उमटू लागली आहे.

यापूर्वी शेट्टी आणि खोत यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमध्ये नेमके काय चालते, हे दोघांनाही चांगलेच ज्ञात आहे. त्याचाच गौप्यस्फोट मंत्री खोत यांनी करून गुरूवरच कुरघोडी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर ओतल्या जाणाºया दुधात किती पाणी मुरलेले असते, याचा अंदाज यावरुन लावता येऊ शकतो. एकूणच शेट्टी व खोत या दोघांनीही आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कळवळा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे दिसून येते. 

शेट्टी-खोत एकाच नाण्याच्या दोन बाजूकेवळ दूध उत्पादक शेतकरीच नव्हे, तर सर्वच शेतकरी अडचणीत आहेत. शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहेत. दुधाची मुबलक उपलब्धता असताना दूध आंदोलन करणे चुकीचे आहे. दूध संघांनी राजू शेट्टींना हाताशी धरुन संघाकडे दूध येणार नाही, याची व्यवस्था केलेली आहे. शेट्टी आणि खोत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दूध संघांनी २७ रुपये दर दिला पाहिजे, याबाबत कोणीच बोलत नाही. राज्य सरकार २७ रुपये दर न देणाºया संघांवर कारवाई करत नाही, उलट शेतकºयांचे दूध संघाकडे येणार नाही, अशा पध्दतीचा शेतकरीविरोधी खेळ सुरू आहे. यापूर्वी उसाच्याबाबतीतही १०० टक्के एफआरपी कायद्याने बंधनकारक असताना, मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी यांनी ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, अशी भूमिका घेऊन कारखानदारांना खूश केले आहे. आता दूध संघांना खूश करण्यासाठी हे दूध आंदोलन सुरू आहे.- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी